Pradhanmantri suraksha yojna : नमस्कार मित्रांनो आपण या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या केंद्र सरकारच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया.
केंद्र सरकारच्या या योजनेतून नागरिकांना केवळ 20 रुपये भरून 2 लाखांचा लाभ मिळणार आहे.
यासाठी नेमकी ही योजना काय आहे ?, या योजनेची अतिशय योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ? ही सुविधा या लेखात पाहणार आहोत.
तरी या योजनेचे काही अटी, शर्ती, सर्वप्रथम त्या जाणून घेऊया.
योजनेचे नियम व अटी
18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाभार्थ्यांचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आपोआप कट होईल.
हप्त्यासाठी आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मे असेल.
प्रत्येक बँकेत या संदर्भातील अर्ज आहेत, खाते असणाऱ्या प्रत्येकाने अर्ज करू शकतात.
या योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत ?
अपघात विमा नोंदवलेले सर्व नागरिक हे लक्ष गट असणार आहेत, 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाभार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला 2 लाख रुपये अर्थसहाय्य मिळेल.
लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये व अपंगत असल्यास एक लाख रुपये या योजनेतून दिला जातो.
अशा प्रकारे ही शासनाची एक जबरदस्त अशी योजना 7आहे.
या योजनेतून अर्थातच प्रधानमंत्री सुरक्षा योजना अंतर्गत तुम्हाला या लाभ दिला जातो. आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी पैसे भरायची गरज नाही, बँक खात्यातून दरवर्षी जो काही 20 रुपये आहे.
हे तुमच्या खात्यातून काढले जातात, म्हणजेच जमा केले जातात.
अशा प्रकारे शासनाकडून ही एक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही योजना देशभरात राबवली जाते.
या योजनेचा नक्की तुम्ही लाभ घेऊ शकता.