Crop Insurance : राज्यातील जवळपास सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.
याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यानी एकूण १७०० कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे.
तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पीकविमा मंजूर?
जिल्हा | लाभार्थी | रक्कम |
---|---|---|
नाशिक | ३ लाख ५० हजार | १५५.७४ कोटी |
जळगाव | १६,९२१ | ४ कोटी ८८ लाख |
अहमदनगर | २,३१,८३१ | १६० कोटी २८ लाख |
सोलापूर | १,८२,५३४ | १११ कोटी ४१ लाख |
सातारा | ४०,४०६ | ६ कोटी ७४ लाख |
सांगली | ९८,३७२ | २२ कोटी ४ लाख |
बीड | ७,७०,५७४ | २४१ कोटी २१ लाख |
बुलडाणा | ३६,३५८ | १८ कोटी ३९ लाख |
धाराशिव | ४,९८,७२० | २१८ कोटी ८५ लाख |
अकोला | १,७७,२५३ | ९७ कोटी २९ लाख |
कोल्हापूर | २२८ | १३ लाख |
जालना | ३,७०,६२५ | १६० कोटी ४८ लाख |
परभणी | ४,४१,९७० | २०६ कोटी ११ लाख |
नागपूर | ६३,४२२ | ५२ कोटी २१ लाख |
लातूर | २,१९,५३५ | २४४ कोटी ८७ लाख |
अमरावती | १०,२६५ | ८ लाख |
एकूण | ३५,८,३०३ | १७०० कोटी ७३ लाख |
Yojana : महाराष्ट्रातील योजनांची माहिती – येथे पहा